पेशवाईच्या काळातील घाशीराम कोतवाल हे काय प्रकरण आहे?

पेशवाईच्या काळातील घाशीराम कोतवाल हे काय प्रकरण आहे?


या नाटकाने महाराष्ट्रात प्रचंड गदारोळ उडवला आणि इतिहास घडवला. 

हे नाटक ब्राह्मणविरोधी आहे, त्यातून पेशावाईतील ब्राम्हणाची आणि त्यातही प्रामुख्याने नाना फडणीस यांची बदनामी झाली असल्याचे आरोप या नाटकावर झाले होते

त्यावर बंदी घालावी, अशी मागणी आणि त्यासाठी आंदोलनेही झाली होती. आज ते स‌र्व विसरुन गेले आहे. परंतू 

नाटकातील पात्र ही मात्र खरी असल्याने साहजिकच लोकांच्या मनावर नाना फडणवीस यांच्या चारित्र्याचा असा अतिशय वाईट ठसा उमटवला गेला आहे

यातील दोन प्रमुख ऐतिहासिक व्यक्तिरेखा आहेत त्या म्हणजे, नाना फडणवीस आणि घाशीराम कोतवाल .

एकंदर 'घाशीराम कोतवाल' या नाटकानंतर घाशीरामचा इतिहास लोकांसमोर आलाच नाही. आली ती फक्त दंतकथा.

मुळात बाजीराव पेशवे पासून ते माधवराव पेशव्यांच्या काळापर्यंत पुण्यास कोतवाल नावाचा प्रकार नव्हता. 

नंतर शहराच्या सामाजिक सुरक्षते साठी कोतवाल म्हणजेच पोलिस अधिकारी नेमण्याची कल्पना पुढे आली.

👉 त्यानुसार 1764 रोजी माधवरावांनी बाळाजी नारायण केतकर यांच्याकडे पुणे शहराच्या व्यवस्थेचे काम सोपविले. 

👉नाना फडणीस हे त्यांचे वरिष्ठ होते. 

👉नाना फडणवीस क्सह सर्वात भरवसा ठेवला तो गुप्तहेर खात्यावर.

👉बारभाई असो रघुनाथ राव पेशवे असो नाना फडणवीस चे गुप्तहेर कलकत्ता पासून दिल्ली पर्यंत होते त्यावेळी कोतवाल चा उपयोग या साठी नाना फडणवीस ने करून घेतला.

👉फितुरी आणि गद्दारी वर लक्ष ठेवण्यासाठी नानांना घाशीरामच्या गुप्तहेरांकडून मिळणा-या बातम्यांचा चांगलाच उपयोग झाला आणि त्याबद्दल नाना बक्षिसे सेवन त्याची वारंवार स्तुती करीत .

👉1772 साली माधवराव यांचा देहान्त झाला आणि 

👉1774 ला नारायणराव यांचा खून झाला, 

👉राघोबा चे वाढते प्रस्थ ,

👉बारभाई मधला अविश्वास यामुळे कोतवाल या पदाचे महत्व खूप वाढले आणि भ्रष्टाचारपण.

♨️नानांच्या कारभारात कोतवालाचे प्रस्थ हळूहळू वाढले. 

♨️शहराच्या बंदोबस्ताखेरीज गुन्हे, चो-या, व्यभिचाराची प्रकरणे, मद्यपान, जुगार यांसारखे गुन्हे रोखणे, याबरोबरच शहरातील बाजाराची व्यवस्था, वजनमापे, वाद्ये, हजाम, एवढेच नव्हे तर वेश्या यांची देखरेख, शहर स्वच्छता, रस्ते, इमारती, पाहुण्यांचा स‌त्कार, दानधर्म, दस्तऎवजाची नोंदणी अशी कितीतरी कामे कोतवालाकडे आली. त्यामुळे कोतवाल म्हणजे शहरातला मुख्य व महत्त्वाचा अंमलदार बनला.

घाशीराम कोतवाल चे घर(पुणे कॅम्प)

बाळाजी नारायण केतकरांनंतर

  1. बाबूराव राम
  2. जनार्दन हरी
  3. धोंडो बाबाजी
  4. आनंदराव काशी

असे कोतवाल झाले. 

त्यानंतर काही करणावास्तव 1777 रोजी नानांनी घाशीराम कोतवालाची कोतवालपदावर नेमणूक केली.

👉घाशीराम कोतवाल हे आनंदराव काशी चे भाऊ.

पण त्यात काही व्यवहाराचा भाग पण असावा.रात्रीच्या वेळेस पुण्याच्या रस्त्यांवर शहरात येणार्‍या-जाणार्‍यांची कसून तपासणी, जागता पहारा, शहराची सुरक्षा, चोर्‍या-जुगार रोखणे, शहराची स्वच्छता इत्यादी कामे त्याच्या काळात व्यवस्थित केली जात होती, परंतू त्याच्या हातून एक चूक झाली की त्यामूळे तो एक मोठा गुन्हेगार आणि वेडा मनोवृत्तीचा कोतवाल आहे अशी पुढे जनसामान्यांची समजूत झाली.

पुण्यात राहणाऱ्या चार्ल्स मलेट यांनी जेम्स 'फोर्ब्स' ला हा किस्सा पत्राद्वारे सांगितलं आहे .

श्रावण महिना चालू होता, 1791 चा,

 पुण्यात दक्षिण वाटप जोरात चालू होते. त्यावेळी पर्वती च्या खाली एक इमारत होती रमण म्हणून त्यात हे इटप चालायचे

 याच दक्षिणेच्या अपेक्षेने त्यांच्या कारकीर्दीत 25 तेलंगि ब्राह्मण पुण्यास आले होते. 

ते आपल्या देशास जाण्यास निघाले असता, त्यांना घाशीरामच्या शिपायांनी कैद केले आणि भवानी पेठेतील चावडीत खणाचे भुयार होते तेथे कोंडले. 

त्या भुयारात वारा जाण्यास जागा नव्हती. त्यामुळे कोंडमारा होऊन 21 लोक मृत्यू पावले.

मानाजी फाकडे नावाच्या गृहस्थांच्या लक्षात ही गोष्ट आल्यावर त्यांनी ती पेशव्यांच्या कानी घातली. 

21 ब्राह्मणांचा कोंडून मृत्यू झाल्याची बातमी पुण्यात कळताच एकच हलकल्लोळ उडाला. 

पुण्यातील स‌र्व ब्रह्मवृंद पेशव्यांच्या वाड्यासमोर जमला. 

अत्याचारी घाशीरामाला हत्तीच्या पायी देऊन ठार करावे, अशी त्यांची मागणी होती.

घाशीरामचे म्हणणे मात्र वेगळेच होते. कोंडून ठेवल्याने त्या ब्राह्मणांचा मृत्यू झाला, ही हकीकत खोटी आहे. 

हे लोक शहरात चो-या करीत असत. त्यांना धरून आणून ठेवले असता, त्यांनी अफू खाऊन जीव दिला, असे त्याने सांगितले. 

त्यावर त्या ब्राह्मणांना मूठमाती देण्याची परवानगी दिली. त्याबरोबरच या प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही त्यांनी दिले. 

त्यावेळचे पेशवे चे न्यायाधीश अय्याशास्त्रीजी यांच्याकडे चौकशीचे काम सोपविण्यात आले होते. 

त्यांनी केलेल्या चौकशीत घाशीराम दोषी ठरला

त्याच्या मुसक्या बांधून गारद्यांच्या पहा-यात ठेवण्यात आले.

👉घाशीरामला कैद केले तरी ब्राम्हणाचे स‌माधान झाले नव्हते. 

👉त्याला हत्तीच्या पायी देण्याचा त्यांचा आग्रह होता

👉तेव्हा त्याला हत्तीवर बांधून शहरातून फिरविण्यात आले.

👉त्यावेळी ब्राह्मणांनी त्याला दगड मारले.

👉 त्यात त्याचे डोके फुटले

👉तरी ब्राम्हण लोक शांत होईना.

👉शेवटी दुस-या दिवशी, 31 ऑगस्ट 1791 रोजी त्याला उंटावर उलटे बसवून गारपिरावर नेऊन सोडल आणि मारले.

♨️घाशीराम कोतवाल विषयी दोन मतप्रवाह आहे काही जण म्हणतात की तो खूप प्रामाणिक होता तर काही जण म्हणतात की तो भ्रष्ट होता.

विजय तेंडुलकर यांनी आपल्या नाटकासाठी हेच रूप निवडले.

♨️घाशीराम कोतवाल माणूस सुस्वरूप, बुद्धिमान आणि गोडबोल्या होता. नाना फडणीसांची त्याच्यावर मोठी मर्जी होती.

♨️काहीजण असे म्हणतात की पण या काळात घाशीरामने अनेकांवर अन्याय केला. अतिशय निर्दयपणे पुण्याचा कारभार केला. त्यामुळे पुढे असा बदनाम कारभार 'घाशीरामी कारभार' म्हणूनच ओळखला जाऊ लागला. पण अखेर घाशीरामचे शंभर पापांचा घडा भरला.

काही जणांचे मत विरुद्ध आहे

🔴आतले राजकारण

👉रघुनाथराव पेशवे यांची खास मर्जी मानाजी फाकडे यावर होती.

👉नारायण राव पेशवे यांचा खून झाल्यावर तो भले बारभाई कडे परत आला.पण नाना फडणवीस चा त्यावर राग होता.

👉मानजीबापान योग्य संधी ची वाट पाहत होता.घाशीराम कोतवाल हा नाना फडणवीस चा माणूस.त्यामुळे ज्ञाने ही संधी सोडली नाही.पण बळी गेला घाशीराम कोतवाल चा.

👉मानाजी फाकडे हा गृहस्थ शिंदे घराण्यातील असून पानिपतच्या युद्धात शिंद्यांच्या घराण्यातील सर्व प्रमुख मंडळी मरण पावल्यावर शिंद्यांची सरदारकी महादजीला न देता या मानाजीस देण्याचा घाट रघुनाथरावने घातला. 

👉मानाजी पराक्रमी असून रघुनाथरावास सामील असल्याने मराठी राज्याच्या सेवेत कमी पडला.

👉मानाजी फाकडे हा सरदार फार रुबाबदार व मर्दानी सौंदर्याचा नमुना असल्यामुळे त्याला फाकडा म्हणत. 

👉त्यावेळी दोनतीन लोकांना फाकडा म्हणत.कॅप्टन स्ट्युअर्ट हा इंग्रज अधिकारी इस्टुर फाकडा म्हणून ओळखला जाई.[1]

👉छत्रपती शिवाजी महाराज आणि माधवराव पेशवे सोडले तर कोणताही मराठा आणी पेशवे प्रत्येकजण मग नाना फडणवीस असो नानासाहेब पेशवे असो, राघोबा पेशवे असो प्रत्येकजण नाटक शाळा बाळगून असो.

👉नाना फडणवीस ची अतिरिक्त विषयवासनेशिवाय त्यानां कोणताहि दुर्गुण नव्हता.पण तेवढाच दुर्गुण बरोबर वेचून ह्या नाटकाने नाना फडणवीस च्या कर्तृत्वावर मोठा अन्याय केलाय.

👉घाशीराम कोतवाल त्या काळी नानांचा लाडका होता आणि नंतर त्यांच्याच कारकिर्दीत मरण पावला.

👉 त्यामुळे त्याच्या वेगाने झालेल्या उदयानेआणि पतानामुळे पुढची पिढी ने मानाविषयी आणि घाशीराम कोतवाल विषयी अफवा पसरू लागल्या.

👉नानासाहेब पेशवे पासून दुसर्‍या बाजीरावांच्या कारकीर्दीपर्यंत या अतिशय बुद्धिमान आणि शिस्तप्रिय कारभार्‍यामूळेच इंग्रजांना मराठेशाहीत प्रवेश करता आला नाही तो केवळ नाना फडणवीसांमूळेच.पण नानफडनविस च्या एकचू दुर्गुणाचे वाभाडे काढून या महान माणसाला बदनाम झाले, बदनामी तेंडुलकरांनी केली नाही त्यापेक्षा सामान्य लोक जबाबदार आहे.

विजय तेंडुकर यांनी त्यावेळीच परिस्थितीचे वर्णन करून आताच्या परिस्थितीशी संगत लावली पण त्यांचा रोष बरोबर होता पण कळात नकळत नाना फडणवीस वर अन्याय झालाय.

चार्ल्स मलेट ची बायको अंबर कौर (चार्ल्स ने सुसना या स्त्री साठी तिला पुण्यात सोडून गेला , जाताना तीन मुले घेऊन गेला) हे चित्र जेम्स वेल्स ने काढले आहे 1792.

तळ टीप

1]THE STORY OF GHASHIRAM KOTWAL - A PROVOST OF PUNE

2]The End of Ghashiram Kotwal

3]'https://www.google.com/amp/s/m.timesofindia.com/city/pune/Violent-past-behind-military-confines/amp_articleshow/55534204.cms

4]घाशीराम कोतवाल'चा पहिला प्रयोग... सूत्रधाराच्या नजरेतून !

तळटीपा

Comments

Popular posts from this blog

बाळाजी आवजी चिटणीस